वारकऱ्यांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडीचा उपयुक्त उपक्रम : फराळ वाटप आणि मोफत आरोग्य सेवा
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत"

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे : Deepsagar news| (प्रतिनिधी)
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून रविवारी (ता. २२) पंढरपूरकडे प्रस्थान झाले. हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने निघालेल्या या वारीमध्ये वंचित बहुजन आघाडी – पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने एक उपयुक्त आणि जनसेवाभिमुख उपक्रम राबविण्यात आला.
वारी मार्गावर थकलेल्या व श्रमलेल्या वारकऱ्यांसाठी राजगिरा लाडू, केळी, वेफर्स आणि पाण्याच्या बाटल्या यांचा भरगच्च फराळ वाटण्यात आला. या उपक्रमातून केवळ अन्न वाटप न होता, मानवीतेचा आणि आपुलकीचा हात पुढे करण्यात आला.
याचबरोबर, मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. वयोवृद्ध, महिला, व मुलांना याचा विशेष लाभ मिळाला. अनेक वारकऱ्यांनी आरोग्य शिबिराचा फायदा घेतल्याने समाधान व्यक्त केले.
या उपक्रमात राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, संघटक नागेश भोसले, महासचिव विश्वास गदादे, सतीश साबळे, हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप क्षेत्रे, नवनीत अहिरे, श्याम गोरे, अजित पानसरे, बी. पी. सावळे, अरविंद कांबळे, रवींद्र गायकवाड, कल्याण चौधरी, कोमल शेलार, दादासाहेब गायकवाड, राहुल दहिरे, प्रज्योत गायकवाड, योगेश वानखेडे, सुमीत हतांगळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वंचित बहुजन आघाडीने या माध्यमातून समाजाप्रतीची जबाबदारी आणि सेवाभाव अधोरेखित केला. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम खरोखरच उल्लेखनीय ठरला.
वारी म्हणजे केवळ चालण्याचा प्रवास नाही – ती एकतेची, सहकार्याची आणि श्रद्धेने बांधलेल्या माणुसकीच्या नात्यांची सुंदर शृंखला आहे.