भूम: भोगलगांव येथील नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:
ता.भूम : मौजे भोगलेगांव/नवलगांव ग्रामपंचायत च्या हद्दीमध्ये राष्ट्रीय जलपेय योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे बांधकाम सध्या जोरात सुरू असून त्या टाकीच्या बांधकामासाठी ठेकेदाराकडून सिमेंट खडी रेती लोखंड इत्यादी टाकी उभारण्यासाठी लागणारे साहित्य अतिशय कमी प्रमाणात वापरण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत त्याचबरोबर या कामाची पाहणी करण्यास ग्रामसेवक यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असा आरोप देखील स्थानिक नागरिक करत आहे
या पाण्याच्या टाकीचे बांधकाम संबंधित ठेकेदाराकडून निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याने भोगलगांव ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचा सुर आहे
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही योजना पुरती फसली आहे. निविदेप्रमाणे काम करण्यात आले नसल्याने ग्रामपंचायत व शासनाची दिशाभूल करून ही योजना योजना राबवली जात असल्याची चर्चा सध्या गावामध्ये सुरू आहे
पुढील काळामध्ये गावाला पाणी मिळणे कठीण झाले आहे या योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. निविदेनुसार कामातील त्रुटी तातडीने दूर करण्यात याव्यात. ग्रामसेवक यांनी या निष्कृष्ट दर्जाच्या कामा कडे तातडीने लक्ष घालून हे काम बंद करून झालेल्या कामाचे बिल ग्रामपंचायतकडून ठेकेदारास अदा करण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संपादक विजयसिंह उर्फ सहदेव ( बप्पा) गायकवाड यांनी केले आहे