Uncategorized

आचारसंहिता लागली मात्र आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी नाहीच

सुनावणीसाठी प्रकरण वकिलांनी खंडपीठासमोर नमूद करणे गरजेचे

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (दि.15) होणार होती.

मात्र, आजही हे प्रकरण सुनावणीपर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली मात्र हे प्रकरण अजुनही सुनावणीला येऊ शकले नाही.

एकही दिवस सुनावणी नाही

सर्वोच्च न्यायालयात सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण तब्बल ८ दिवस सूचीबद्ध करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ३ वेळा हे प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र, एकाही दिवशी यावर सुनावणी होऊ शकली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये या प्रकरणाला तारीख पे तारखी मिळत असल्याचे दिसत आहे.

प्रकरण सरन्याधिशांपूढे

दरम्यान, हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आहे. १० नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत. त्याअर्थी त्यांच्या कामकाजाचे फार कमी दिवस शिल्लक आहेत. जर त्यांच्या निवृत्ती अगोदर यावर सुनावणी झाली नाही तर हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठासमोर वर्ग करण्यात येईल. मग मात्र याला उशीर होईल. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी व्हायची असेल तर हे प्रकरण नमूद करावे लागेल.

सुनावणीसाठी प्रकरण वकिलांनी खंडपीठासमोर नमूद करणे गरजेचे

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाती वकील सिद्धार्थ शिंदे पुढारी’शी बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणूक आचारसंहिता आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा संबंध नाही. हे प्रकरण आधीच न्यायालयाच्या पटलावर आहे. जोपर्यंत हे प्रकरण पटलावर आहे, तोपर्यंत सुनावणी होऊ शकते. या प्रकरणाचे महत्व अधोरेखित करून दोन्ही पक्षांच्या वकीलांनी हे सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर नमूद करणे गरजेचे होते. तसेच प्रकरणाचे महत्व सांगुन आणि तातडीची निकड सांगून सरन्यायाधीशांकडून सुनावणीसाठी एक निश्चित तारीखही वकीलांनी घेणे गरजेचे आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात आणि आतापर्यंत तसे झाले नाही. नमुद केल्याशिवाय या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी होण्याची शक्यता कमीच दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button