Uncategorized

१ जून २०२५ पासून लागू होणार नवे बँकिंग नियम – खातेदारांच्या खर्चात वाढ होणार

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :

मुंबई: देशातील सर्वच बँकांचे खातेदार सावध! भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक महत्त्वाची नियमावली घोषित केली असून ती येत्या १ जून २०२५ पासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी, आयसीआयसीआय यांसारख्या सर्व प्रमुख बँकांच्या ग्राहकांना या नव्या नियमांचा थेट परिणाम भोगावा लागणार आहे.

आरबीआयने बँकिंग व्यवहारांशी संबंधित सेवा शुल्कात वाढ जाहीर केली असून काही नवीन शुल्केही लागू केली जाणार आहेत. यामुळे खातेदारांच्या रोजच्या व्यवहारांवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे.

खाते बंद करण्याच्या शुल्कात वाढ

बँक खाते उघडल्यानंतर १४ दिवसांच्या आत बंद केल्यास कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र,

१४ दिवसांनंतर आणि ६ महिन्यांपूर्वी बंद केल्यास – ₹१०० दंड

६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत खाते बंद केल्यास – ₹३०० दंड

एटीएम वापराबाबत नवीन नियम

इतर बँकेच्या ATM चा वापर केल्यास ग्राहकांना खालीलप्रमाणे वाढीव शुल्क भरावे लागणार आहे:

रोख रक्कम काढल्यास – ₹२३

बॅलन्स किंवा मिनी स्टेटमेंट तपासल्यास – प्रत्येकी ₹१२

चेक रिटर्न शुल्क

जर एखादा चेक रिटर्न झाला, तर:

ग्रामीण भागातील व ज्येष्ठ नागरिक खातेदार – ₹४००

इतर खातेदार – ₹५००

कॅश ट्रान्झॅक्शनवर मर्यादा

दरमहा ५ व्यवहार आणि एकूण ₹५ लाखांपर्यंत मोफत व्यवहार

त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी – ₹१००० अतिरिक्त शुल्क

ग्राहकांनी घ्यावयाची काळजी

नवीन नियम लक्षात घेता खातेदारांनी आपले व्यवहार अधिक नियोजनपूर्वक करावेत. गरज नसताना खाते उघडणे, इतर बँकांच्या ATM चा अतिरेक, विना कारण चेक व्यवहार टाळावेत. तसेच कॅश व्यवहारांची संख्या आणि रक्कम यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button