Uncategorized

स्वामी विवेकानंद गार्डन कोरडे पाच महिने झाले, पिण्यासाठी थेंबभरही पाणी नाही!

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा;

कोंढवा ( बु): कोंढवा टिळेकर नगरमधील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टाकी कोरडी पडली आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या कडाक्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी व्यायामासाठी येणारे वृद्ध, खेळण्यासाठी येणारी लहान मुले आणि संध्याकाळी निवांत वेळ घालवण्यासाठी येणारे नागरिक पिण्यासाठी पाण्याच्या शोधात वणवण भटकत आहेत.

महानगरपालिकेचे दुर्लक्ष – नागरिकांचा हिरमोड

महानगरपालिकेकडून पाण्याची कोणतीही सोय न केल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजी आहे. ज्या गार्डनमध्ये झाडांना नियमित पाणी दिले जाते, तिथेच नागरिकांना प्यायला पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टाकी कोरडी, नळ बंद – पिण्यासाठी थेंबभरही पाणी नाही

गेल्या पाच महिन्यांपासून पाणी टाकीत सोडले जात नसल्याने नळातूनही पाणी येत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने गार्डनमध्ये येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत आहे.

नागरिकांची मागणी – त्वरित पाणीपुरवठा सुरू करा!

नागरिकांची साधी मागणी एवढीच आहे – गार्डनमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय त्वरित उपलब्ध करावी. उन्हाळ्याच्या तीव्र तापमानात पाणी ही मूलभूत गरज आहे, ती भागवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button