. “स्वारगेट बसस्थानकात महिलांची सुरक्षा धोक्यात – पोलिसांचे दुर्लक्ष, गुन्हेगार मोकाट,

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
स्वारगेट बसस्थानकात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न – पोलिसांचे दुर्लक्ष गुन्हेगारांना मोकळे रान
पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडल्याने सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापनाने २२ फेब्रुवारी २०२५ रोजीच पोलिसांना पत्र लिहून सुरक्षेसंदर्भात तातडीने कारवाईची मागणी केली होती, मात्र पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी ही हृदयद्रावक घटना घडली.
पोलीस आणि गुन्हेगारांमधील संगनमताचा गंभीर आरोप!
स्वारगेट पोलीस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हेगारांमधील साटेलोटे, आर्थिक देवाणघेवाण आणि अभय दिल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. विशेषतः पोलीस शिपाई (ब.न. १००१६) शिवदत्त गायकवाड हे आनेक गुन्हेगारांशी थेट संपर्कात असून, त्यांना संरक्षण देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड हे गुन्हेगारांना गुप्त माहिती पुरवणे, कारवाई टाळण्यासाठी “चिरीमिरी” घेणे आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्वार्थ साधणे यामध्ये गुंतले आहेत. इतकेच नव्हे, तर काही निवडक गुन्हेगारांना अभय देऊन प्रतिस्पर्धी गटांवर दबाव टाकण्याचे कामही ते करत असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकारामुळे स्वारगेट परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.
राजकीय हालचाली – घोषणाबाजी की ठोस कृती?
या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रत्येक घटनेनंतर फक्त घोषणा आणि आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि ठोस उपाययोजना केव्हा होणार? हा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. विक्रम गायकवाड हत्येप्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली असली तरी, स्वारगेट घटनेतील दोषींवर कोणती कारवाई होणार आणि व्यवस्थेतील त्रुटींचे काय? हा मुद्दा अद्याप अनुत्तरित आहे.
महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
या घटनेमुळे बसस्थानक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि गजबजलेल्या परिसरांतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पोलिस यंत्रणेची दुर्लक्ष वृत्ती आणि निष्क्रियता यामुळे गुन्हेगार अधिक धाडसी होत आहेत. सुरक्षेच्या नावाखाली नवीन नियम आणि योजना जाहीर होतात, पण त्या प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतात? याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे.
प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा विश्वास कमी होण्याचा धोका आहे, अशी भावना संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती दिसली पाहिजे, अशी समाजाची ठाम मागणी आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – जबाबदार कोण?
या घटनेनंतर खाजगी सुरक्षा रक्षकांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे, मात्र त्यांना पाठीशी घालणारे आणि सुरक्षेच्या जबाबदारीत हलगर्जी करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि इतर दलालांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. व्यवस्थेतील काही लोकांनी अशा घटनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून गुन्हेगारीला बळ दिले आहे का? हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत
या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रत्येक घटनेनंतर फक्त घोषणा आणि आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि ठोस उपाययोजना केव्हा होणार? हा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. विक्रम गायकवाड हत्येप्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली असली तरी, स्वारगेट घटनेतील दोषींवर कोणती कारवाई होणार आणि व्यवस्थेतील त्रुटींचे काय? हा मुद्दा अद्याप अनुत्तरित आहे.
महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
या घटनेमुळे बसस्थानक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि गजबजलेल्या परिसरांतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पोलिस यंत्रणेची दुर्लक्ष वृत्ती आणि निष्क्रियता यामुळे गुन्हेगार अधिक धाडसी होत आहेत. सुरक्षेच्या नावाखाली नवीन नियम आणि योजना जाहीर होतात, पण त्या प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतात? याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे.
प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा विश्वास कमी होण्याचा धोका आहे, अशी भावना संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती दिसली पाहिजे, अशी समाजाची ठाम मागणी आहे.