लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही पवित्र मतदानाचा हक्क बजावणार .सर्वधर्मीय नागरिकांनी कोंढवा येथील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये एकत्र येऊन केली प्रतिज्ञा

दिपसागर न्यूजऑनलाइन पोर्टल सेवा:
पुणे कोंढवा : टिळेकर नगर स्वामी विवेकानंद गार्डन येथे सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन असे प्रतिज्ञा केला की आम्ही सर्व भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे आज प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाहीच्या परंपराचे जतन करू आणि उक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकीचे पावित्र्य राखून प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे धर्म वंश जात पात अशा विचाराच्या दबावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता आम्ही सर्वजण पवित्र मतदानाचा हक्क बजावणार आहोत
तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येक नागरिकाने उत्साहात मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग घेणे गरजेचे आहे असे आव्हान देखील करण्यात आले यावेळी दिपसागर न्यूज चे मुख्य संपादक विजयसिंह गायकवाड, ॲड रवी कामठे अनिल जयस्वाल गार्डनचे सुरक्षा रक्षक सागर हरपळे बाळकृष्ण आरडे रवीभाऊ वाघमारे साबळे,आकांक्षा शिंदे व इत सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
लोकशाही बळकट करण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी आवर्जुन मतदान करा, असे कोंढवा टिळेकर नगर येथील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये सर्व धर्मीय एकत्र येऊन नागरिकांनी निर्धार केला
मतदान माझा अधिकार…
मतदान हा प्रत्येक भारतीय व्यक्तीचा महत्त्वाचा
हक्क, अधिकार तसेच कर्तव्य आहे. त्यामुळे
मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय
नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे
कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही
स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे
माझे मत माझे भविष्य
माझे मत ही शक्ती आहे ज्याद्वारे मी माझे
स्वतःचे भविष्य घडवतो हे सत्य नाकारता येणार नाही. मी बेपर्वाईने मतदान केले तर
माझे भविष्य अंधकारमय होईल; तथापि, जर मि
शहाणपणाने मतदान केले तर ते केवळ
माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठी महत्वाचे आहे