ॲड विशाल जानराव यांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या कामकाजामुळे ॲट्रॉसिटी केसमधील आरोपीला झाला अटकपूर्व जामीन मंजुर
ॲड विशाल जानराव यांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीला मिळाला अटकपूर्व जामीन

दिपसागर न्यूज पोर्टल ऑनलाइन सेवा:
पुणे प्रतिनिधी: स्वारगेट पोलीस स्टेशन येथे ७ नोव्हेंबर सन 2022 रोजी दिपसागर न्यूज चे संपादक विजयसिंह गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपी मालोजीराव ,अरविंद सोलंकी, बाळासाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता या गुन्हाया मधिल दोन वर्षाने बाळासाहेब गायकवाड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज ॲट्रॉसिटी विशेष जिल्हा न्यायालय पुणे जिल्हा यांच्याकडे सादर केला होता त्याच्या अनुषंगाने मा.जिल्हा अतिरिक्त सेशन कोर्ट(ॲट्रॉसिटी विशेष न्यायालय) पुणे यांनी फिर्यादी गायकवाड यांना आरोपीच्या जामीन अर्जावर आपले म्हणणे सादर करण्याची नोटीस पाठवले होते
फिर्यादी गायकवाड यांनी त्यांच्या समाजाचे मुंबई उच्च न्यायालय चे ॲड विशाल जानराव यांना भेटून सदरची केस चालवण्यास दिली आणि वकीलपत्र कोर्टामध्ये सादर करून ॲट्रॉसिटी मधील आरोपीच्या जामीन विरोध करण्याचे कामकाज विश्वासाने त्यांच्याकडे सोपवले आणि त्यांची फी पण दिली परंतु ॲड विशाल जानराव यांनी जाणीवपूर्वक आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जास विरोध करण्यास हलगर्जीपणा करून प्रत्येक तारखेस कोर्टामध्ये हजर राहण्यास टाळाटाळ केली आणि संपूर्ण फी घेऊन कोणताही युक्तिवाद फिर्यादीतर्फे जानराव यांनी केला नाही आणि चुकीच्या कामकाजामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन मिळण्यास सुलभ झाले असल्याने आरोपीचे वकील ॲड कपील बुंदेले यांनी सक्षम पणे युक्तिवाद करून ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन मिळून दिला
23 ऑक्टोबर रोजी आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी होती त्यावेळी गायकवाड यांनी ॲड जानराव यांना फोन करून तारीख असल्याची आठवण करून दिली आणि युक्तिवाद करण्याची विनंती केली परंतु जानराव हे असे म्हणाले की मी आज बारामती कोर्टामध्ये आहे पुढच्या तारखेला युक्तिवाद करतो आपला युक्तिवाद कोर्टाने ऐकल्याशिवाय कोर्ट जामीन देणार नाही मी स्टेशन डायरी मागवली आहे असे खोटे सांगून तारखे दिवशी ॲड विशाल जानराव जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याने प्रस्तुत आरोपीविरुद्ध फिर्यादीतर्फे त्यांच्या वकिलांनी एका ही शब्दात विरोध न केल्याने जिल्हा वअति सत्र न्यायाधीश ॲट्रॉसिटी विशेष न्यायालय पुणे मा. न्यायाधीश (सं. रा. नरवाडे) यांनी आरोपीस 30,000/- रुपयांच्या जामीन मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला
त्यामुळे ॲड विशाल जानराव यांची या ॲट्रॉसिटी केस मध्ये संशयास्पद भूमिका असल्याचे जाणवत आहे
या प्रकरणावरून स्पष्ट दिसून येते की ॲड विशाल जानराव यांना कोणती सामाजिक बांधिलकी नाही विशेष म्हणजे जानराव एका आंबेडकरी चळवळीतील संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि ते ॲट्रॉसिटी केस संदर्भात ते संवेदनशील नसल्याचे देखील समोर आले आहे ज्या समाजामध्ये जन्मला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे द्यावे लागते अशी मन आहे आहे परंतु ज्या समाजावर अन्याय होतो त्या समाजातील विद्वान हायकोर्टचे वकील असे वागत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न अनुत्तीर्ण आहे
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 18 मार्च 1956 रोजी रामलीला मैदानावर केलेल्या भाषणात असे म्हणतात की “मुझे पढ़े-लिखे लोगो ने ही धोखा दिया है?” याचीच प्रचिती आज जाणवत आहे