जातीय हिंसाचारप्रकरणी एकाच वेळेस ९८ जणांना जन्मठेपेची शिक्षा

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा
बंगळुरू, दि.२५- कर्नाटकातील कोप्पळच्या जिल्हा न्यायालयाने दलित समाजातील लोकांवरील अत्याचार आणि जातीय हिंसाचारप्रकरणी मोठा निकाल दिला आहे.
दलित समाजाच्या झोपड्यांना आग लावल्याप्रकरणी न्यायालयाने १०१ जणांना शिक्षा सुनावली आहे. १०१ दोषींपैकी ९८ दोषींना जन्मठेप आणि ५०००- रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य तीन दोषींना ५ वर्षे सश्रम कारावास आणि २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या. चंद्रशेखर सी. यांनी गुरुवारी या प्रकरणी १०१ जणांना दोषी ठरवले होते. नाकारल्याने पीडित आणि फिर्यादी पक्षाने याबाबत माहिती दिली. सरकारी वकील अपर्णा
बुंदी यांनी सांगितले की या प्रकरणात ११७ लोक आरोपी होते. त्यापैकी १६ जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.सध्या जन्मठेपेची शिक्षा झालेले सर्व दोषी बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहात आहेत.देशात जातीय हिंसाचाराच्या प्रकरणात पहिल्यांदाच इतक्या लोकांना ¡एकत्रितपणे शिक्षा सुनावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हे प्रकरण २८ • ऑगस्ट २०१४ रोजी ची घटना आहे हॉटेल दुकानात गावातील आणि न्हाव्याच्या दुकानात दलितांना प्रवेश नाकारल्याने हाणामारी झाली..त्यानंतर आरोपींनी गंगावती तालुक्यातील मराकुंबी गावात दलित समाजातील लोकांची घरे पेटवून दिली. या घटनेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. याहिंसाचारामुळे मराकुंबीला तीन महिन्यांपासून
पोलिसांच्या कडक निगराणीत ठेवण्यात आले होते. या
हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्य दलित हक्क समितीनें -मराकुंबी ते बंगळुरू असा मोर्चाही काढला होता. तसेच गंगावती पोलीस ठाण्याला अनेक दिवसांपासून घेराव घालण्यात आला होता.